सोमवारी 8 जून 2015 सकाळी 9 च्या दरम्यान शालेचे गेट उघडले. शाळा सुरु व्हायला अजुन आठवडा बाकी होता. आम्ही सर्व शिक्षक ऑफिस मधे नवीन शैक्षणिक सुरवातीच्या तयारीची आखणी करत होतो तेवढ्यात काही मुल ऑफिस मधे डोकाउन पाहताना दिसली....
हळुहळु मुले जमा व्ह्यायला सुरुवात झाली आणि बघता बघता 50-60 मुले जमा झाली. नव्या वर्षाच्या सुरुवातीचा आनंद त्याच्या चेहर्यावर अधिक झलकत होता. अगदी पहिली पासून सर्व इयत्ता ची मुले आली होती......महिनाभाराच्या सुट्टीनंतर शाळेचा परिसर म्हणजे जरा कमी जंगल झाले होते.... 5 वर्षा पूर्वी लावलेल्या बाग आणि बागेतील झाडानी आज शालेचा पूर्ण परिसर व्यापून गेला होता....सर्वत्र हिरवीगार झाडी ,फुले, ....मनाला आनद होता या सुंदर बागेचा पण ....त्याच्या स्वच्छतेचे टेंशन पण होते... एवढा मोठा परिसर कधी आणि कशी करायची स्वछता....
पण नंतर लक्षात आले अरे आपल्याकडे तर शेकडो हाताची पलटन आहे मग सूचना दिली...दुसर्या दिवशी मुलानी खुरपीव इतर साहित्याच्या मदतीने सर्व परिसर स्वच्छ केला......
दूसरी आनंदाची गोष्ट म्हणजे या बागेत सस्याची पिल्लै पण सापडली....निसर्गाच्या जवळ गेल्याचा आनंद ही मिळाला......
गांधीजी नेहमी म्हणायचे "मुलाना लिहायला वाचायला शिकवा गणित ही शिकवा पण त्याच बरोबर त्याला स्वछता व श्रमाचे महत्त्व ही पटवून दया" आज आमच्या विद्यार्थ्याना हे उमगले याचा आनंद सर्वात जास्त आहे......
No comments:
Post a Comment