शाळेचे छायाचित्र

शाळेचे छायाचित्र
जिल्हा परिषद शाळा कारंदवाडी

15 ऑगस्ट 2018 स्वातंत्र दिन

७२ वा भारतीय स्वातंत्रदिन
जिल्हा परिषद शाळा कारंदवाड़ी येथे उत्साहात साजरा करण्यात आला.
शालांत परीक्षा, स्पर्धा परीक्षा व विविध स्पर्धा यामध्ये यशस्वी विद्यार्थी व विद्यार्थिनी यांचा ग्रामपंचायत कारंदवाड़ी यांच्या मार्फ़त सत्कार व कौतुक करण्यात आले....

15 ऑगस्ट फलकलेखन

15 ऑगस्ट 2018
भारतीय स्वातंत्र्य दिन
पूर्वतयारी
फलकलेखन...
Blackboard writing..

२१ जून योग दिन....

२१ जून आंतरराष्ट्रीय योग दिन आपल्या जिल्हा परिषद शाळा कारंदवाडी प्रशालेत उत्साहात साजरा करण्यात आला. योग अभ्यासाचे महत्व समजवण्यात आले तसेच योगासन याचे प्रात्यक्षिक घेण्यात आले.
     याप्रसंगी कारंदवाडी गावच्या सरपंच सौ.पद्मजा कबाडे, ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवक, ग्रामपंचातचा सेवक वर्ग उपस्थित होते.
       तसेच कारंदवाडी, कृष्णानगर, हाळ शाळेचे शिक्षक व विदयार्थी उपस्थित होते.

प्रवेशोत्सव २०१८

प्रवेशोत्सव २०१८
नवागतांचे स्वागत व मोफत पाठ्यपुस्तक वाटप....
नवीन शैक्षणिक वर्ष २०१८-१९ ची सुरुवात अत्यंत उत्साहात झाली. ग्रंथदिंडी व फेरी काढून गावात प्रवेशोत्सवाची सुरुवात करण्यात आली. नवागतांचे स्वागत व मोफत पाठयपुस्तक वाटप कार्यक्रम मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. या कार्यक्रमासाठी कारंदवाडी गावच्या सरपंच सौ. पद्मजा सुरेश कबाडे, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष सौ. दिपाली विजयकुमार हाके, मिरजवाडी व आष्टा केंद्राचे केंद्रप्रमुख श्री. पी.डी. काळोखे साहेब उपस्थितीत होते. मान्यवरांच्या हस्ते नवागतांचे स्वागत व पाठयपुस्तक वाटप कार्यक्रम घेण्यात आला.

जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांना काय काम असते......

जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांना काय काम असते......
         जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांना काय काम असते? असा प्रश्न सर्वांच्या तोंडात असतो अगदी काम करणाऱ्यांच्या आणि बिन काम करणाऱ्यांचाही.....
कारण आम्ही शिक्षक सॉफ्ट टार्गेट असतो ना...
पण खरी परिस्थिती काय असते याचा कोणी विचार करत नाही व जाणून घेण्याचा प्रयत्न करत नाही.
काल मंगळवार 21 नोव्हेंबर 2017 रोजी दुपारी आम्हा शिक्षकांच्या असे लक्षात आले की दुपारी जेवण झाल्यानंतर शाळेतील मुलांना पिण्यासाठी असणाऱ्या टाकीतील पाणी अपुरे पडते शिवाय कधी नळाला पाणी आले नाही तर आणखी त्रास होतो. मग मुले पर्याय म्हणून इतर ठिकाणी पाण्यासाठी भटकतात कधी कधी यामुळे दूषित पाणी ही पोटात जाण्याची शक्यता होती व पर्यायाने आजारपणाला पण निमंत्रण होते.शाळेच्या आवारात एक बोअर होती पण काही दिवसांपासून नादुरुस्त होती.
       मग मुलांची अवस्था पहिली आणि आम्ही सहकाऱ्यांनी ती बोअर दुरुस्त करून पाण्याची व्यवस्था करायचे ठरवले. चक्र फिरली, बोअर दुरुस्त करणाऱ्यांचा फोन नंबर मिळवला. संपर्क झाला.
आज सकाळी तो साहित्यानिशी शाळेत उभा ठाकला. आम्ही हि खुश पण बोअर दुरुस्त करणे एकट्या प्लंबर चे काम नव्हते त्यासाठी 4-5 व्यक्तीची गरज होती कारण सर्व लोखंडी पाईप काढल्याशिवाय ते शक्य नव्हते. मग जिथे कमी तिथे आम्ही या उक्तीप्रमाणे आम्ही चौघे सहकारी व प्लंबर मिळून काम पूर्ण केले. साधारण 17 पाईप वर काढून त्या  स्वच्छ करून पुन्हा त्या पाण्यात सोडल्या. साधारण तीन-साडेतीन तासाच्या मेहनती नंतर अखेर पाणी बाहेर पडले...
व आमची मेहनत सफल संपूर्ण झाली. मुलांच्या पाण्याची सोय झाली....
आमच्याकडे येणाऱ्या मुलांचे दुसरे पालक म्हणून आम्ही शाळेत काम करतो मग ते शिकवण्याबरोबर त्याच्यासाठी योग्य तेही....
म्हणून आता तरी म्हणू नका आम्ही काय काम करतो म्हणून...

-आम्ही शिक्षक
-जिल्हा परिषद शाळा कारंदवाडी
ता.वाळवा जि. सांगली

‘उबुंटू’ Ubuntu philosophy of Ubuntu in Marathi मराठी 

‘उबुंटू’ Ubuntu philosophy of Ubuntu in Marathi  मराठी 

‘उबुंटू’ Ubuntu ऐकलाय ना शब्द….! ऐकला असेलच आणि नसेल ऐकला! वाचला तर आता तरी लक्षात आला असेलच……. उबुंटू वाचल्यावर काही विचीत्र आणि अनोखळी वाटतो मुळात आपल्या ओळखीच्या भाषेत ऐकल्यासारखं वाटत नाही किंवा आपल्या शब्द संग्रहातही कोठे सपडत नाही असो… नाराज होऊ नका.. आपल्या बुद्धी व शब्दसंपदेवर संशय घेऊ नका कारण ‘उबुंटू’ हा मुळात आपल्या भाषेतलं शब्दच नाहीये आणि त्यामुळे आपल्याला नवीन वाटतो..

पण तुमची उत्सुकता थोडी कमी करतो उबुंटू हा शब्द आफ्रिकेतील ‘झुलू’ भाषेतील शब्द ‘उबुंटू’ या शब्दाचा अर्थ  “I am beacuse We are.”  म्हणजेच “मी आहे कारण आम्ही आहोत.” शांतीदूत नेल्सन मंडेला यांच्यामुळे जगाला  कळलेला एक सुंदर शब्द……

आता तुमचा गोंधळ थोडा फार कमी झालेला असेल पण मग या ‘उबुंटू’चा आपल्याशी काय संबध किंवा याचा अर्थ आपल्याला कसा लागू पडतो. तर हा शब्द  कसा आला त्याची एक सुंदर छोटीशी गोष्ट सांगतो म्हणजे तुमच्या सर्व शंका दूर होतील… आफ्रिकेतील दारिद्र्य पाचवीला पुजलेले त्यामुळे सगळ्याच मुलभूत गरजांची वाणवा  त्यात अन्नाची गरज थोडी जास्तच … त्यामुळे अन्नाचा आणि खाद्यपदार्थांचा मोह थोडा जास्तच… अशाच एका छोट्या वस्तीवरील ही गोष्ट एके दिवशी एक फळांनी भरलेली पाटी त्या वस्तीवरील मुलांच्या समोर आणली पण एक अट ठेवली कि जो कोणी पळत जाऊन सर्वप्रथम त्या पाटीतील फळ घेईल त्या पाटीतील सर्व फळे त्याची … स्पर्धा आयोजकांचा पण उत्साह वाढला होता. अन्नासाठी होणारी स्पर्धा आणि धडपड त्यांना पहायची होती…. स्पर्धामध्ये ठराविक अंतरावर पाटी ठेवली मुले जमा झाली आणि स्पर्धेला सुरवात झाली पण………….

घडले ते अनपेक्षितच अन्न मिळवण्याच्या स्पर्धेसाठी न धावता त्या सर्व मुलांनी एकमेकांचे हात धरले व ती मुले एकत्र त्या फळाच्या पाटीजवळ पोहचले व मोठ्याने ओरडले ‘उबुंटू’……. व मिळून फळे खाल्ली…. या छोट्या मुलांनी जगण्याची एक मोठी रीतच जगाला शिकवली.. ‘मी’ च्या ऐवजी ‘आम्ही’ या संकल्पनेवर या छोट्यांनी मोठा भर दिला आणि खरोखरच सध्या आपल्याला I पेक्षा We ची गरज जास्त आहे…

मानवाच्या बदलत्या संस्कृती व जीवनशैलीनुसार प्रत्येकजण ‘I’ / ‘मी’ या भोवती गुरफटला आहे . मी, माझे, हे मला, ते मला… या सगळ्याभोवती त्याचा प्रवास सुरु आहे आणि आपल्या या वागण्याचे प्रतिबिंब पाल्याबरोबरच इतरांच्या व आपल्या पुढच्या पिढीवर म्हणजेच आपल्या पाल्यावर पडत आहे पूर्वी आपल्याकडे एकत्र कुटुंब पद्धती होती त्यामुळे सार्वजन एकत्र असल्यामुळे साहजिकच घरामध्ये मी पेक्षा आम्ही महत्वाचा होता पण हळू हळू एकत्र कुटुंब पद्धती नष्ट होत गेली आणि छोट्या त्रिकोणी, चौकोनी कुटुंबाचा उदय झाला अशा कुटुंबात मी अभिव्यक्ती वाढत गेली त्यामुळे सध्या पाल्याच्या मध्ये मी हि वृत्ती वाढत आहे

या मी मुळे ही मुले महत्वकांक्षी व आक्रमक बनतात फक्त मी आणि मलाच या त्याच्या अट्टाहासामुळे  स्वतःला व कादाचीत  दुसऱ्याला नुकसान पोहोचवता मी व्यतिरिक्त आम्ही हे त्यांना पटत नाही आणि मग त्यांच्यात न्यूनगंड व एकलकोंडेपणा वाढतो.

पालक व शिक्षक म्हणून आपली जबाबदारी आहे कि आपल्या पाल्याला  व विद्यार्थ्यांना ‘मी’ तून बाहेर कडून त्याला ‘आम्ही’ बनविणे उबुंटू हा शब्द आपल्याला हेच सांगतो कि ज्यावेळू आपण मी तून बाहेर पडून आम्ही असा विचार करू त्यावेळी आपली प्रगती व समानता दोन्ही घडेल आपल्या पाल्याच्या व विद्यार्थ्यांच्या बाबतीत हि आपल्या सर्वाना एकत्र घेऊन त्यांचा विकास करणे गरजेचे आहे. यासाठी आपणही मी पेक्षा आम्ही होऊन प्रयत्न करायला पाहिजेत पालक कुटुंब समाज शिक्षक या सर्व कड्या एकत्र येऊन ज्यावेळी एकसंघपणे काम करतील त्यावेळी पाल्याचा विकास व जडणघडण १०० % पूर्ण होईल.आपल्या बरोबर सर्वाना फायदा व्हायला पाहिजे हे ज्यावेळी आपण आत्मसात करू कोणी मागे राहणार नाहीत मी आहे कारण आम्ही आहोत हि संकल्पना प्रत्यक्षात जगण्यास ज्यावेळी सुरवात होईल  त्यावेळी  खरा मानवतावाद घडेल विद्यर्थ्यांच्या बाबतीत वर्गातील सर्व विद्यार्थी असा विचार करतील व जातील त्यावेळी वर्गातला एकही विद्यार्थी मागे राहणार नाही या गोष्टी स्वीकारल्या व आत्मसाद केल्या तर आपला समाजातही कोणी मागे राहणार नाही

उबुंटू(Ubuntu philosophy) हा छोटा शब्द जगण्याचा मोठा अर्थ शिकवितो I am  पेक्षा  We are  हे महत्वाचे हे दाखवून देतो म्हणून  आजपासून आपणही  I am  नाहीतर we are….

Written By Sandip Koli

गुरुपौर्णिमा....

📝आदरणीय गुरुवर्य.....
गुरु, कोणाला म्हणणार आपण गुरु? आपलं जगणं घडवणारा.....
पावलांना बळ देणारा, कठीण वाटेवर मुद्दाम नेऊन सोडणारा......
पण गुरु म्हणजे आधाराची कुबड़ी नव्हे, हात पसरुन मदत मागत बसण्याची जागा नव्हे......
तो जगायला शिकवतो, तो लढ़ायला शिकवतो.....
त्यांनी पाठीवर हात ठेऊन नुसतं म्हंटल तरी अंगात दहा हत्तीच् बळ येतं.......
आणि मनाच्या गाभाऱ्यात चैतन्याचा संचार होऊन प्रेरणाना उधान येत......
      गुरु कोठे भेटावा...... आपल्याच माणसात... आपल्याच सभोवती....
     दोन देशात युद्धाची तयारी सुरु असते.समोरच्या देशातील सैनिकाची युद्धाची तयारी बघुन सैनिक आपल्या सेनापतीला विनंती करतात की आपण नाही जिंकू शकणार त्याच्या विरोधात. सेनापती नाईलाजाने आपले मत राजा समोर मांडतो. राजा   विचारात पडतो. अशा पेच प्रसंगातून बाहेर पडण्यासाठी राजा आपल्या गुरुचे मार्गदर्शन घेतात. गुरुआज्ञेप्रमाणे राजा आपल्या सर्व सैनिकाना घेऊन गुरुकड़े जातात. गुरु सर्व सैनिकांकडे बाघतात व सर्वाना उद्देशून सांगतात की आपल्या अडचणी मला माहित आहेत फ़क्त आपण एकदा देवाचा कौल घेऊया मग आपण लढाई करायची की नाही ते ठरवू. देऊळात थोडा वेळ घालवून गुरु बाहेर येतात व सांगतात की कौल आपल्या बाजूने आहे. आपणच जिकणाऱ.......सैनिक जोमने लढतात व बलाढ्य शत्रुची दाणादाण उडवतात. जिंकल्यावर राजा गुरुला भेटायला जातो व विजयाचे गुपित विचारतो. या वर गुरु स्मित हास्य करुण म्हणतात की मला तरी कुठे माहित होत मी फ़क्त प्रेरणा दिली त्याचा आत्मविश्वास वाढवला. लढाई तर तुम्हीच जिंकली तुमच्या कर्तुत्वावर.......
         आपण ही माझ्या आयुष्यात असेच आलात. आपली भेटही अशाच एका वळणावर झाली. आपण मला वाट दाखवली. विचारांची पद्धति शिकवलीत. आपण मला प्रश्नाच्या गर्दीत सोडलतं. उत्तरे माहित असूनही ती मला शोधायला लावलीत. विचाराच्या विशाल जगात आपण मला स्वतंत्र पायवाट शोधायला शिकवलीत. प्रसंगी आधार दिलात व जबाबदारीही. ठेच लागून पडलो तर आधारही आपणच दिलात व पुन्हा उठून मार्ग चालण्याचे बळ ही आपणच दिलेत. वाटेत अडचणी आहेत, धोके आहेत म्हणून मागे न फिरता धेय्या पर्यंत चालायचे हे ही आपणच शिकवलत. स्वतःचे निर्णय स्वतः घेऊन स्वताच्या मनासारखे जगायला आपण शिकवलत. कष्ट करूनही आनंदात जगायला आपण शिकवलत.
           जग बदलले, काळ बदलला, वेळ बदलली तरी आपले मोल कमी होणार नाही. कुठलच यश एकट्याच नसतं. आयुष्यात प्रत्येक वळणावर भेटणाऱ्याकडून काही ना काही चांगल घ्यावे हे आपण शिकवलत.
          म्हणून गुरुपौर्णिमेच्या मंगलदिनी आपल्या ऋणात राहून आपल्यविषयी  कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा सुवर्णयोग........
गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा💐💐
🖊संदिप....